मानखुर्द शिवाजीनगर भागातील प्रदूषणाच्या समस्येला कारणीभूत ठरलेली एसएमएस कंपनी बंद करण्याच्या मागणीकडे पर्यावरणमंत्री दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून, समाजवादी पक्षाचे नेते आ. यांनी बुधवारी मंत्रालयात आदित्य यांच्याविरोधात घोषणा दिल्या. तसेच त्यांनी मागणीचे फलकही दाखविले.
एसएमएस कंपनीमुळे त्या भागातील सुमारे १२ लाख नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा दावा आझमी यांनी केला आहे. आम्ही ठाकरे सरकारला पाठिंबा देऊनही ते आमचे काम ऐकत नाहीत. आदित्य ठाकरे हे लोकप्रतिनिधींचाही साधा फोनही उचलत नाहीत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. आझमी यांच्यासोबत नगरसेवक अख्तर कुरेशी, नगरसेविका रुकसाना सिद्धिकी, आयशा रफिक शेख, सायरा फहाद आझमी, इरफान खान आदी उपस्थित होते.
दरम्यान, आजचा दिवस पुन्हा भारतासाठी काळा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया आझमी यांनी बाबरी मशिदीबाबच्या न्यायालयाच्या निकालावर दिली आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सीबीआय, ईडी, आयटी, पोलिस या संस्थांना खेळणे बनवून टाकले आहे. अयोध्येत इतकी मोठी मशीद तोडण्यात आली. आज त्याचा एकही पुरावा शिल्लक नाही. आता या देशात हेच होणार आहे, असा आरोप त्यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times