‘उत्तरप्रदेशचे सरकार फेल ठरले असताना तेथील काही नेत्यांची संतापजनक वक्तव्य समोर येत आहे. एक नेते म्हणत आहेत की आई-वडिलांनी जर मुलींवर संस्कार केले, तर अशा घटना घडणार नाहीत. मुली शेतात काम करण्यास जातातच का, असेही तेथील नेते म्हणतात. पण मला त्या नेत्यांना सांगायचे आहे की, नेताजी हे गोरगरिब कुटुंब आहेत. जोपर्यंत येथे मुली किंवा परिवारातील लोक शेतामध्ये काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांचे पोट भरत नाही. त्यांच्या घरात कोणी नेता नाही, जो भ्रष्टाचार करून करोडो रुपये घरामध्ये आणून देईल,’ असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
वाचाः
‘आई-वडिलांच्या संस्कारावर बोट दाखवतात?, मुलींच्या चारित्र्यावर संशय घेताय? पण एक लक्षात ठेवा, भारत हा कृषी प्रधान देश आहे. का नाही महिलांनी शेती करावी ?, असा सवालही उपस्थित करतानाच, तुमची जी मानसिकता आहे, ती बदलली पाहिजे. ही विकृती बदलली पाहिजे, असेही त्यांनी हाथरस प्रकरणावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना सुनावले आहे.
वाचाः
‘हाथरस घटनेत त्या मुलीचा जीव गेलाय. तरी ज्या पद्धतीने संबंधित नेते वक्तव्य करत आहेत, ती त्यांनी मागे घ्यावीत, व सर्व महिलांची माफी मागावी. अन्यथा उत्तरप्रदेशमधील महिलाच रस्त्यावर उतरून याचे उत्तर देतील, कारण आता महिलांचा अपमान कोणीही सहन करणार नाही,’ असेही देसाई यांनी स्पष्ट केलेय.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times