मुंबईः ‘ नेत्यांनी सुशांत आणि त्यांच्या कुटुंबाला बदनाम करण्याची व अपमानित करण्याची सुपारी घेतल्याचं दिसतंय?’ असा सवाल भाजप नेते यांनी केला आहे. शिवसेनेनं दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर हल्ला चढवला होता. त्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

सीबीआयने मुंबईत येऊन तपास सुरू करताच सुशांतचे ‘गांजा’, ‘चरस’ प्रकरण बाहेर काढले. सुशांत हा एक चारित्र्यहीन, उडाणटप्पू तरुण कलाकार असल्याचे चित्र समोर आले. बिहारच्या पोलिसांना तपासात हस्तक्षेप करू दिला असता तर कदाचित सुशांत व त्याच्या कुटुंबाचे रोजच धिंडवडे निघाले असते, अशी टीका शिवसेनेनं केली होती. शिवसेनेच्या या टीकेनंतर भाजप आमदार राम कदम यांनी संजय राऊत आणि शिवसेना नेत्यांना धारेवर धरलं आहे.

‘सामनाकार शिवसेना नेत्यांनी सुशांत आणि त्याच्या कुटुंबाला बदनाम आणि अपमानित करण्याची सुपारी घेतल्याचं दिसतंय. ७४ वर्षांच्या सुशांतच्या वडिलांना आणि कुटुंबीयांना वारंवार शिवसेना नेत्यांनी अपमानित केलं. सुशांतच्या मृत्यूनंतरही शिवसेना नेते त्याच्याबद्दल बरे- वाइट बोलायला मागे पुढे पाहत नाहीत,’ असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

‘मृत्यूनंतर शत्रूलादेखील बरं वाइट बोलू नये हा हिंदू धर्मातला संस्कार शिवसेना नेते सामनाकार राजकारणाच्या स्वार्थापोटी विसरले हे दुर्देवी. सीबीआय तपास अजून पूर्ण झाला नाही त्याच्या आधीच आत्मसाक्षात्कार आशीर्वाद प्राप्त झालेले महाविकास आघाडीचे सरकार आणि शिवसेना नेते सुशांत प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याआधीच निष्कर्षापर्यंत येतात याचं आश्चर्य आहे. त्यांना कोणाला वाचवायचं आहे? हा प्रश्न आहेच,’ असंही ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here