मुंबईः राज्यात करोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. सध्या राज्यात करोनाचे १४ लाखांहून अधिक रुग्ण आहेत. तर, राज्यातील मृत्यूदर ही २.४६ टक्के इतका आहे. यावरूनच भाजपचे आमदार यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे.

करोना संकटावर मात करण्यासाठी सरकारकडून माझं कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत करोना संकटापासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला तसेच शेजाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. या मोहिमेवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकावर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. ‘याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो. आता म्हणताहेत की माझे कुटुंब माझी जबाबदारी. आता अजून काही महिन्यांनंतर तुम्ही सगळे मरा मी राहतो घरी, असं म्हणतील,’ असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान, करोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वत:हून स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. या मोहीमेचा हा मुख्य उद्देश आहे. करोनाला रोखण्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स’वर (स्वयंसुरक्षा) भर देणे गरजेचे आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here