पुणे: दिल्लीकरांनी सात महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नुकताच एक नाट्यप्रयोग प्रत्यक्ष अनुभवला. गांधी जयंतीचे निमित्त साधून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या () पुढाकारातून हा प्रयोग साकारण्यात आला. दिल्लीतील खुल्या रंगमंचावर सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून प्रयोग झाला. जे दिल्लीतील प्रशासन आणि कलावंतांना जमले, ते पुण्या-मुंबईत का जमू शकत नाही, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

गांधी जयंतीनिमित्त ‘एनएसडी’त शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘पहला सत्याग्रही’ हा नाट्यप्रयोग सादर केला. या प्रयोगाला खुल्या रंगमंचाच्या प्रेक्षागृहाच्या क्षमतेपेक्षा निम्म्या रसिकांना प्रवेश देण्यात आला होता. बसण्याच्या जागेत सहा फुटांचे अंतर राखले होते. नाटकाची तिकीटविक्री ऑनलाइन करण्यात आली. आत प्रवेश करताना प्रत्येकाने मास्क घातले होते. प्रवेशद्वारावर प्रत्येकाचे तापमान तपासण्यात येत होते.

पुण्यात रोजगार मिळत नाही; म्हणून दररोज कलाकार आंदोलन करीत आहेत. अनेकांनी कंटाळून रोजगाराचा दुसरा मार्ग स्वीकारला आहे. प्रशासनाला अनेक विनवण्या करूनही अद्याप नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झालेले नाहीत. दिल्लीत साकारण्यात आलेला प्रयोग समोर ठेवून महाराष्ट्रातही परवानगी मिळावी, या मागणीने आता जोर धरला आहे.

गांधी जयंतीनिमित्त आम्ही सुमारे सात महिन्यांनंतर प्रयोग करायचे ठरवले. प्रयोगावेळी सुरक्षित अंतराचे सर्व नियम कटाक्षाने पाळले. दिल्ली सरकारच्या प्रशासनाने उत्तम सहकार्य केल्याने हे शक्य झाले. दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही हे घडू शकते.

– सुरेश शर्मा, अध्यक्ष, एनएसडी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here