आबुधाबी: मुंबईच्या संघाने राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी मोठा विजय मिळवला. त्यामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावरही आला. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये मुंबईचे खेळाडू मस्ती करत होते. त्यावेळीच संघाच्या मालकीण नीता अंबानी यांचा फोन आला. पण या फोननंतर नेमकं काय झालं, पाहा…

राजस्थानवर विजयानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये असताना अचानक नीता अंबानी यांचा फोन आला. त्यावेळी नीता यांनी संघाला विजय मिळवल्याबाबत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये मुंबईचा राखीव खेळाडू अनुकूल रॉयही होता. त्यावेळी नीता यांनी अनुकूलला विचारले की, तु राजस्थानविरुद्धच्या सामन्यात शानदार झेल पकडलास, त्यामुळे तुझ्या आता भावना काय आहेत?

मुंबई इंडियन्सच्या संघाने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला पाहायला मिळत आहे. यामध्ये मुंबईचे खेळाडू आणि नीता यांचे बोलणेही ऐकायला मिळते. त्याचबरोबर मुंबईचा संघ यावेळी सेलिब्रेशन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चाहत्यांनाही हा व्हिडीओ चांगलाच आवडलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्याच्या घडीला व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत मात केली आणि मोठा विजय साकारला. मुंबईने राजस्थानपुढे विजयासाठी १९४ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान राजस्थानला पेलवेल नाही आणि मुंबईने मोठा विजय साकारला.

या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ हा गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. यापूर्वी मुंबईच्या संघाने पाच सामने खेळलेले होते. या पाच सामन्यांमध्ये मुंबईने तीन विजय मिळवलेले होते, तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलेला होता. यापूर्वी तीन विजयांसह मुंबईचा संघ सहा गुणांवर आहे. त्यामुळे हा सामना जर मुंबईने जिंकला तर त्यांना अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी होती आणि तसेच पाहायला मिळाले. कारण हा सामना जिंकल्यावर मुंबईच्या संघाचे ८ गुण झाले. त्याचबरोबर त्यांचा रनरेट चांगला असल्यामुळे त्यांना अव्वल स्थान पटकावता आले आहे. मुंबईच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला खाली खेचत अव्वल स्थान पटकावले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here