वाचा:
राजेश टोपे यांनी प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण होईल, अशी अपेक्षा करूया’, असे वक्तव्य टोपे यांनी माध्यमांशी बोलताना केले. टोपे यांच्या या विधानातून लॉकडाऊनला जवळपास पूर्णविराम मिळू शकतो, असेही संकेत मिळू लागले आहेत.
वाचा:
दरम्यान, राज्यात सध्या अनलॉकचा पाचवा टप्पा सुरू आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवत असताना मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारचे शटर पुन्हा खुले झाले आहे. ५० टक्के ग्राहक क्षमतेच्या अटीवर हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. करोनाच्या अनुषंगाने त्यांना गाइडलाइन्सही देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे राज्यांतर्गत रेल्वे वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. एसटी सोबतच खासगी बस वाहतूकही १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. त्यात आता धार्मिक स्थळे, शाळा, व्यायामशाळा आणि मुंबईतील लोकलसेवा पूर्ववत कधी होणार, याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. त्याबाबत विरोधकही सातत्याने मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार गंभीरपणे या सर्वाचा विचार करत असून राज्याची त्यादिशेने वाटचाल सुरू झाल्याचे टोपे यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे.
वाचा:
खडसेंबाबत केले सूचक वक्तव्य
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षात नाराज असून ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. खडसे लवकरच कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ स्वीकारतील, असे बोलले जात आहे. या अनुषंगाने भाजप मधील एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत का, असा प्रश्न विचारला असता राजेश टोपे यांनी सूचक भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये योग्य लोकांचे नेहमी स्वागतच आहे. आमचा पक्ष कर्तृत्ववान माणसाला नेहमीच स्वीकारत असतो, असे टोपे म्हणाले. अधिक भाष्य मात्र त्यांनी टाळले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times