वाचा:
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांना मनातील राग टीव्ही कॅमेऱ्यांसोबत व्यक्त न करण्याची विनंती केली होती. यासंबंधी प्रसारमाध्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले, ‘एकनाथ खडसे यांच्यासोबत ३० वर्षे काम केल्याने आपण त्यांना चांगले ओळखतो. एक सक्षम विरोधी पक्षनेता कसा असतो, हे त्यांनी दाखवून दिले होते. त्यांच्या योगदानामुळेच पूर्वी भाजप व शिवसेनेचे सरकार आले होते. अशा नेत्याला कॅमेऱ्यासमोर बोलू नये, अशी बंदी घालणे योग्य नाही. पक्षात अशी वागणूक मिळत असल्याने त्यांचा संताप होणे सहाजिकच आहे.’ थोरात यांच्या या विधानाने एकप्रकारे आगीत तेल ओतण्याचेच काम केले आहे.
वाचा:
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त होऊन लवकरच भाजपची सत्ता येणार, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले होते. त्यांना उत्तर देताना, नड्डा यांचे हे वक्तव्य म्हणजे गाण्याचे धृवपद आहे. गाणे गाताना जसे धृवपद पुन्हा पुन्हा उच्चारावे लागते, तसेच राज्यात पुन्हा आपले सरकार येणार असे भाजपला त्यांच्या कार्यकर्त्याना धीर देण्यासाठी वारंवार म्हणावे लागत आहे, असा टोला थोरात यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करीत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
वाचा:
अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी
टीव्ही चॅनलच्या टीआरपी गैरप्रकाराबद्दल थोरात म्हणाले, ‘मुंबई पोलिसांनी त्यांची सक्षमता सिद्ध करताना या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. त्यामुळे सत्य जनतेसमोर आले आहे. रिपब्लिक वाहिनीने सातत्याने लोकशाही विरोधात असत्य गोष्टी जनतेसमोर पोहचविण्याचा व आर्थिक स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी,’ अशी मागणीही थोरात यांनी केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times