जळगाव: तालुक्यातील बहाळ येथे काठालगत असलेल्या दत्त मंदिराजवळ कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलींपैकी एक मुलगी पाण्यात पडून वाहून गेली. शनिवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. (वय १३) असे वाहून गेलेल्या मुलीचे नाव आहे.

वाचा:

बहाळ येथे शुक्रवारी दि. १० रोजी राजेंद्र मरसाळे यांच्या मुलीचे लग्न होते. त्या लग्नासाठी ह्या मुली आलेल्या होत्या. पूनम ही आपल्या मावशीसोबत लग्नासाठी आली होती. शनिवारी सकाळी नऊ वाजता ती लग्नासाठी आलेल्या अन्य दोन मुलींसह कपडे धुण्यासाठी घराच्या समोरच असलेल्या गिरणा नदीवर आली. कपडे धुऊन झाल्यावर त्या आंघोळीसाठी नदीपात्रात उतरल्या.

वाचा:

दोघी बहिणींना वाचवण्यात यश

नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पूनम ही वाहून गेली. तर तिच्या सोबत खुशी चंदू सौदागर (वय १३) व मनीषा चंदू सौदागर (वय ११ रा. भोकरभारी ता. पारोळा) या मात्र थोडक्यात बचावल्या. या दोघी पाण्यात बुडत असतानाच काही अंतरावर असलेल्या गणेश अशोक भोई याच्या लक्षात आले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता नदीपात्रात उडी मारत दोन्ही मुलींना पाण्याच्या बाहेर काढले. त्यानंतर पूनमचा शोध घेण्यात आला. सावदा पर्यंत गिरणा नदी पात्रात शोध घेऊनही काहीच थांगपत्ता लागला नाही. शोधकार्य दिवसभर सुरू होते. मात्र पूनम आढळली नाही. नदीकिनारी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, पूनम ही दुपारी गावी येथे वडिलांकडे जाणार होती. वडील उखा किशन खैरनार यांची परिस्थती गरिबीची असल्याने पूनम ही गेल्या सात, आठ महिन्यापासून मावशीकडे पनवेल येथे वास्तव्यास होती. उखा खैरनार यांना दोन मुलगे आणि तीन मुली आहेत. त्यापैकी पूनम ही धाकटी होती.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here