मुंबईः राज्यात आज ३०९ करोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, १० हजार ७९२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आजही तब्बल १० हजार ४६१ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं चिंता वाढवली होती. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाची लाट ओसरताना दिसत आहे. काल, तब्बल २६ हजार इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे झाले होते. आजही १० हजार ४६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२ लाख ६६ हजार २४० इतकी झाली आहे. व राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ८२. ८६ टक्के इतके झाले आहे.

राज्यात आज १० हजार ७९२ इतक्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णसंख्या १५ लाख २८ हजार २२६ इतकी झाली आहे. तर, आज ३०९ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण मृतांचा आकडा ४० हजार ३४९ इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७६,४३,५८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,२८,२२६ (१९.९९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,१०,७८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here