मुंबई: दक्षिण मुंबईसह पूर्व, पश्चिम उपनगरांत वीज पुरवठा खंडीत झाल्यानं मुंबईत गेल्या अर्धा तासांपासून वीज गायब झाली आहे. ‘’ला वीजपुरवठा करणाऱ्या ‘टाटा पॉवर’च्या वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने यंत्रणा ‘ट्रिप’ झाली आणि त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे ‘बेस्ट’च्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापारेषणच्या ४०० किलो कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भागात याचा फटका बसला आहे. कळवा ते पडघे या मार्गावरील विद्युत वाहिन्यांवर मल्टिपल ट्रीपिंग झाले असून टाटा पॉवर कडून येणाऱ्या वीज पुरवठ्यावर हे ट्रीपिंग आहे. त्यामुळे ३८० मेगावट वीज पुरवठ्याला फटका बसलाय. डहाणूकडून येणाऱ्या विद्युत वाहिन्यांना याचा फटका बसला आहे.

वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे युद्धपातळीवर सुरु आहेत. सध्या उरणमधील २२० केव्ही ची वहिनी पूर्ववत होतेय तर, पश्चिम क्षेत्र भार नियमन व राज्य भार नियमन केंद्राकडून जोमाने प्रयत्न सुरू आहेत, लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं लोकल सेवेलाही फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेवरही ठप्प झाली आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून लोकल एकाच जागी थांबली आहे असून लोकलमध्ये प्रवासी अडकले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा लोकल सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या हार्बर मार्गावरील काही लोकल पुन्हा सुरू झाल्याचं, समजतंय

कळवा ते पडघे या मार्गावरील विद्युत वाहिन्यांवर मल्टिपल ट्रीपिंग झाले असून टाटा पॉवर कडून येणाऱ्या वीज पुरवठ्यावर हे ट्रीपिंग आहे. त्यामुळे ३८० मेगावट वीज पुरवठ्याला फटका बसलाय. डहाणूकडून येणाऱ्या विद्युत वाहिन्यांना याचा फटका बसला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here