मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई वीज अचानक गायब झाल्यामुळे ठप्प झाली आहे. लोकल ट्रेनपासून ते कार्यालय, गृहनिर्माण सोसायट्यांमधील लिफ्ट बंद पडल्या आहेत. अनेक ठिकाणी लोक अडकल्याची माहिती आहे. टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात अडथळा आल्यामुळे मुंबई आणि उपनगरातील वीज गेल्याचं बेस्टने सांगितलं आहे. वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्यांचंही बेस्टने सांगितलं. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत वीज पुरवठा पूर्ववत केल्याचं सांगण्यात येत आहे.

टाटाचं म्हणणं काय?

वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी ३ हायड्रो युनिट आणि ट्रॉम्बे युनिट्समधून काम चालू आहे, अशी माहिती टाटा पॉवरकडून देण्यात आली आहे. कळवा, खारघर उपकेंद्रांवर सकाळी १०.१० मिनिटांनी तांत्रिक अडचण सुरू झाल्यानंतर मुंबईतील वीज पुरवठा खंडीत झाला, असंही सांगण्यात आलं आहे.

महापारेषणच्या ४०० किलो कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भागात याचा फटका बसला आहे. कळवा ते पडघे या मार्गावरील विद्युत वाहिन्यांवर मल्टिपल ट्रीपिंग झाले असून टाटा पॉवर कडून येणाऱ्या वीज पुरवठ्यावर हे ट्रीपिंग आहे. त्यामुळे ३८० मेगावट वीज पुरवठ्याला फटका बसलाय. डहाणूकडून येणाऱ्या विद्युत वाहिन्यांना याचा फटका बसला आहे.

महापालिका संपर्क क्रमांक

मुंबई महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांक जारी केले आहेत.

– ०२२-२२६९४७२७
– ०२२- २२६९४७७२५
– ०२२- २२७०४४०३

मुंबई शहरात बेस्टकडून वीज पुरवठा होत असला तरी टाटाकडून वीज येते. मुंबई शहरात काही मोजक्या ठिकाणीच टाटाकडून वीज पुरवठा होतो. तर मुंबई उपनगरात टाटा, अदानी आणि महावितरण (भांडुप व त्यापुढे) कडून वीज पुरवठा होतो.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here