नागपूर: ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास काटोल मार्गावरील वास्तुशिल्प सोसायटी येथे घडली. ( Latest Updates )

वाचा:

(वय ५७),असे मृतकाचे नाव आहे. ते विशेष शाखेत तैनात होते. नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास विजय हे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. एक तासानंतरही ते घरी परतले नाहीत. दरम्यान, विजय यांच्या पत्नी वर्षा या त्यांना शोधण्यासाठी घराबाहेर आल्या असता विजय हे साडीने गळफास घेतलेले दिसले. हे दृष्य पाहून वर्षा यांनी हंबरडाच फोडला. शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी विजय यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली आहे.‘ मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही’,असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. विजय यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. गत काही दिवसांपासून ते तणावात होते, असे कळते. गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

वाचा:

पतीच्या हत्येची सुपारी; पत्नी अटकेत

नागपूरमध्ये अन्य एका घटनेत पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचे उघड झाले. पती नेहमी मारझोड करतो, त्रास देतो म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी पत्नीने त्याच्या हत्येची सुपारी दिली. ५० हजारात पतीची हत्या घडवून आणणाऱ्या महिलेला आणि तिच्या एका साथिदाराला पोलिसांनी अटक केली आहे. जयदीप लोखंडे (वय ३९,रा. सावनेर) असे या प्रकरणातील मृतकाचे तर त्याची पत्नी देवका उर्फ कविता लोखंडे, चंदन नत्थु दियेवार (वय २८) आणि सुनील जयराम मालवीय (वय २७) अशी आरोपींची नावे आहेत. जयदीप कविताला मारहाण करीत असे. ती त्याच्या जाचाला कंटाळली होती. त्याला संपविण्यासाठी तिने चंदनला हाताशी धरले. जयदीपचा खून करायचा आहे, त्यासाठी तुझी मदत हवी असल्याचे तिने त्याला सांगितले. या दोघांनी सुनीलला जयदीपचा काटा काढण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिली. हत्येची ही घटना ९ ऑक्टोबर रोजी घडली. जयदीप आणि चंदन एकमेकांना ओळखतात. याचा फायदा चंदनने घेतला. आज सुनीलचा वाढदिवस आहे, आपल्याला पार्टीसाठी शेतावर जायचे असल्याचे चंदनने जयदीपला सांगितले. त्याला शेतात नेऊन त्याच्यावर चाकूहल्ला करत त्याची हत्या केली. ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार आणि केळवद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश मट्टामी यांच्या चमूने केलेल्या एकत्रित कारवाईत या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी कविता आणि चंदन यांना अटक केली आहे. सुनील अद्याप फरार आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here