जळगाव: विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ५१ हजार २१२ बाधित रुग्णांपैकी ४७ हजार ३९६ रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहेत. जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५५ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. ( Latest Updates )

वाचा:

जिल्ह्यात आतापर्यंत ४७ हजार ३९६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५५ टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार ५८७ ॲक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १ हजार ८७० रुग्ण हे लक्षणे नसलेले तर अवघे ७१७ रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ३९९ रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ४११, डेडिकेटेड मध्ये ३९६ रुग्ण उपचार घेत आहेत. तर विलगीकरण कक्षात १९२ रुग्ण असून गृह अलगीकरणात १ हजार ४७१ रुग्ण आहेत.

वाचा:

सध्या जिल्ह्यात १२ हजार ८५४ बेड उपलब्ध असून त्यापैकी २ हजार १९ बेड ऑक्सिजनयुक्त आहेत व ३२२ आयसीयू बेड आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजनची आवश्यकता भासत असलेल्या रुग्णांची संख्या ३५० इतकी असून आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या १२३ इतकी आहे.

जिल्ह्यात करोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. आरटी-पीसीआरद्वारे ९९ हजार ७०८ तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे १ लाख २५ हजार ७८७ अशा एकूण २ ला ९९२ चाचण्या निगेटिव्ह तर ५१ हजार २१३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. इतर अहवालांची संख्या १ हजार १२३ असून अवघे १६७ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एका दिवसात ४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत १ हजार २३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १ हजार ७९ रुग्ण हे ५० पेक्षा जास्त वयोगटातील असून ५५६ रुग्णांना जुने आजार असलेले होते. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा हा २.४० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here