ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून सध्या भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रामुळं या वादाला फोडणी मिळाली होती. कोश्यारी यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तुम्ही अचानक सेक्युलर झालात का?, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं होतं. माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं ठाकरे म्हणाले होते.
वाचा:
या सगळ्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी आपली भूमिका मांडली. ‘आम्ही देव मानतो. उद्धव ठाकरे हे देखील पूर्वी देव मानायचे, आता ते मानतात की नाही माहीत नाही. तुम्ही स्वताला हिंदुत्ववादी मानता तर मग हिंदूंच्या मागण्यांना विरोध का करता, असा प्रश्नही त्यांनी केला. राज्यपाल संविधानातील ‘सेक्युलॅरिझम’ मानत नाहीत का असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांनाही पाटील यांनी उत्तर दिले. ‘आम्ही केवळ मंदिर उघडा म्हणत नाही, सर्व धार्मिक स्थळे उघडा ही आमची मागणी आहे. पण खासदार संजय राऊत हे फार विद्वान आहेत, सर्वधर्मसमभावमध्ये हिंदू धर्म येत नाही का,’ असा टोला त्यांनी राऊत यांना मारला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times