वाचा:
राज्यात आज १३ हजार ७१४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले असून आतापर्यंत एकूण १३ लाख ३० हजार ४८३ रुग्णांनी या आजारावर विजय मिळवला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण () ८५.०४ % एवढे झाले आहे. आज राज्यात १० हजार २२६ नवीन रुग्णांचे निदान झाले तर राज्यात आज ३३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७९ लाख १४ हजार ६५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ लाख ६४ हजार ६१५ (१९.७७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री यांनी दिली.
वाचा:
राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा (अॅक्टिव्ह रुग्ण ) आकडा आधीच दोन लाखांच्या खाली आला आहे. सध्या राज्यात १ लाख ९२ हजार ४५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत करोना संसर्गाने राज्यात ४१ हजार १९६ जणांचा बळी घेतला आहे. आज सर्वाधिक ५४ मृत्यूंची नोंद पुणे महापालिका हद्दीत झाली आहे तर मुंबईत ४६ मृत्यू नोंदवले गेले आहेत. सातारा जिल्ह्यात २८ तर सांगली जिल्ह्यात आणखी २४ जण करोनाने दगावले आहेत. आज नोंदवण्यात आलेल्या ३३७ मृत्यूंपैकी १५३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर ४६ मृत्यू हे मागील आठवड्यातील व उर्वरित १३८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
वाचा:
पुणे जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली
पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण झपाट्याने खाली येत आहे. सध्या पुणे जिल्ह्यात ४० हजार ३६४ करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर ठाणे जिल्हा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठाण्यात सध्या ३० हजार २२९ अॅक्टिव्ह रुग्ण असून ही रुग्णसंख्या काही प्रमाणात खाली येताना दिसत आहे. मुंबई पालिका हद्दीतील करोना संसर्गाचा विचार केल्यास नवीन रुग्णांचे प्रमाण अजूनही मोठे असले तरी तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा पुणे व ठाणे जिल्ह्यापेक्षा येथे कमीच आहे. मुंबईत सध्या २२ हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times