म. टा. प्रतिनिधी, : भिवंडीला जाण्यासाठी एकजण रिक्षात बसताच आधीच रिक्षात बसलेल्या लुटारूंनी चाकूने हल्ला करून तीन हजारांची लूट केल्याची धक्कादायक प्रकार ठाण्यातील येथे घडला. या हल्ल्यात ही व्यक्ती जखमी झाली असून याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयराज जोमनीनाडा असे या जखमी व्यक्तीचे नाव असून ते भिवंडीतील पद्मानगर भागात राहतात. ते हमालीचे काम करतात. एकजण गावी जाणार असल्याने त्याला सोडण्यासाठी जयराज खारेगाव टोलनाका येथे आले होते. पुन्हा घरी जाण्यासाठी रात्री दोन वाजता रिक्षाची प्रतीक्षा करत थांबले होते. त्यावेळी एक रिक्षा थांबली. या रिक्षात अगोदरच तिघे बसले होते. त्यांनी संगनमत करून त्यातील एकाला रिक्षाच्या डिकीमध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर दोघांनी जयराज यांना दोघांच्यामध्ये बसवले. प्रवासात लुटारूंनी जयराज यांच्याकडील पैसे काढून घेण्यासाठी जबरदस्ती सुरू केली. त्यांनी प्रतिकार केला असता चाकूने वार करून तीन हजारांची रोकड काढून घेऊन त्यांना रिक्षातून उतरवले. या हल्ल्यात जयराज जखमी झाले आहेत. तिन्ही लुटारू हे २० ते ३० वर्ष या वयोगटामधील होते. या प्रकरणी कळवा पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here