कोल्हापूर: केंद्र सरकारने केलेली निर्यातबंदी आणि करोनामुळे साखरेचा उठावच न झाल्याने देशात गत हंगामातील ११५ लाख मे. टन साखर अजूनही गोडावूनमध्ये अडकली आहे. यंदा विक्रमी साखर उत्पादन होणार असल्याने ४३८ लाख मे. टन साखर शिल्लक राहण्याची चिन्हे असून ते ठेवायचे कुठे आणि त्याचे करायचे काय या प्रश्नाने कारखानदारांची झोप उडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान,परतीच्या पावसाच्या दणक्याने हंगाम लांबणार असल्याने संपूर्ण ऊस गाळपाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

गेल्यावर्षी ऊसाचे क्षेत्र कमी असल्याने देशात केवळ २७२ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यामागील वर्षातील शिल्लक साखर व गतवर्षीचे उत्पादित असे मिळून देशात ४१७ लाख मे. टन साखर देशात उपलब्ध होते. पण करोनामुळे त्याला मागणीच आली नाही. शिवाय केवळ ५९ लाख मे. टनाची निर्यात विविध देशात झाली. साखरेला अपेक्षित दर न नसल्याने कारखान्यांनी त्याची विक्री न करता गोडावूनमध्येच ठेवली. त्यामुळे बहूतांशी कारखान्यांचे गोडावून आजही हाऊसफुल्ल आहेत. किलोला दोन रूपये दर वाढवून देण्याचा कारखान्यांना मान्य नसलेला सरकारचा प्रस्ताव आहे. पण त्याबाबतही निर्णय झाला नाही.

वाचा:

यंदा देशात विक्रमी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. कारण पाऊसमान चांगले असून ऊसाचे क्षेत्रही वाढले आहे. नव्या हंगामात ३२० लाख मे.टन साखर उत्पादित होणार आहे. त्यामध्ये गतवर्षीचे व नवीन उत्पादित असे तब्बल ४३८ लाख टन साखर यंदा देशात उपलब्ध होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही साखरेला फारशी मागणी नाही. शिवाय केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने त्याला ब्रेक लागणार आहे. एकीकडे निर्यात बंदी, दुसरीकडे मागणीचा अभाव यामुळे साखर गोडावूनमध्ये अडकणार आहे. साखर ठेवायची कुठे हा मोठा प्रश्न कारखानदारांसमोर आहे. यातच बफर स्टॉक योजनेची अमंलबजावणी थांबविल्याने कारखानदारांची झोप उडणार आहे.

वाचा:

देशात अनेक राज्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे उसतोडणी आणखी काही दिवस शक्य नसल्याने हंगामाची सुरुवात लांबणीवर पडणार आहे. यामुळे वेळेत हंगाम संपवतानाच कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचे मोठे आव्हान कारखानदारांसमोर राहणार आहे. महाराष्ट्रात गतवेळी केवळ ६२ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा १०१ मे. टन उत्पादन होणार असल्याने राज्यातील कारखाने अधिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

गाळप हंगाम २०१९- २० ( सर्व आकडे लाख मे. टनमध्ये )

…………………………भारत………… महाराष्ट्र

साखर उत्पादन……. २७२……………… ६२

साखर खप………….. २४०…………….. ७२

साखर निर्यात…………. ५९……………. १५

शिल्लक साखर……….. ४१७…………. १४२

गाळप हंगाम २०२० -२१ अपेक्षित ( सर्व आकडे लाख मे. टनमध्ये )

……………………………… भारत……… महाराष्ट्र

साखर उत्पादन ………….३२०…………… १०१

साखर खप…………….. २५०…………….. ७२

साखर निर्यात………. बंदी ………… बंदी

शिल्लक साखर…………. ४३८………….. १३७

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here