मुंबई: महापालिकेच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा शॉक लागून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. हे कर्मचारी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करत होते.
कुर्ला पूर्वेकडील सुमन नगर परिसरात महापालिकेच्या जलवाहिनीचे आज दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सात कर्मचारी दुरुस्तीचे काम करत होते. या कर्मचाऱ्यांना विजेचा शॉक लागला. यातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. गणेश दत्तू उगळे (वय ४५) आणि अमोल काळे (वय ४०) असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर नाना पुकाले (वय ४१), महेश जाधव (वय ४०), नरेश अंधगले (वय ४०), राकेश जाधव (वय ३९) आणि अनिल चव्हाण (वय ४३) अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टर दीपाली यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times