बारामतीः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे नेते यांनी आजपासून बारामतीतून अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पाहणीला सुरूवात केली. यावेळी ते गावागावात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. आशातच, अतिवृष्टीमुळं रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळं गावकऱ्यांपर्यंत कसं पोहोचायचं हा प्रश्न असतानाच देवेंद्र फडणवीस चिखल तुडवत गावकऱ्यांची भेट घेतली आहे.

दौंड तालुक्यातील चिंचोली गावातील डांबरी रस्ता पावसाच्या पाण्यामुळं रस्ता पूर्णपणे खचला आहे. तर, रस्त्यावर चिखल सातल्यानं गाडीही जात नाही म्हणून शेवटचा पर्याय म्हणून फडणवीसांनी पायीच जाण्याचा निर्णय घेतला. तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. तसं. ट्वीटही त्यांनी केलं आहे. पावसाची ही आहे तीव्रता घरांचे नुकसानसुद्धा मोठे आहे, शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

त्याचबरोबर, दौंड तालुक्यातील मळद गावातीलही पूरस्थितीची पाहणी त्यांनी केला आहे. मळद गावातील पूल वाहून गेला आहे. त्यामुळं गावाशी संपर्क तुटला आहे. शेतीचं नुकसान झालंय, जनावरं वाहून गेली, गेल्या आठ दिवसांपासून वीज नाही, पिण्याचे पाणी नाही. कोणी आजारी पडले तर, दवाखान्यात जायला रस्ता नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here