म. टा. प्रतिनिधी, : शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील उमेश मोरे यांचे अपहरण करून त्यांची झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मोरे यांची हत्या करून मृतदेह ताम्हिणी घाटात फेकला होता.
कपिल विलास फलके (वय ३४, चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय २८, आष्टी, जि. बीड), रोहित दत्तात्रय शेंडे (वय ३२, मार्केट यार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात उमेश चंद्रशेखर मोरे (वय ३३, रा. धनकवडी) असे अपहरण आणि हत्या झालेल्या वकिलाचे नाव आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times