खासगीत बऱ्याच जणांनी खडसेंबरोबर राष्ट्रवादीत यायची इच्छा बोलून दाखवली आहे. खडसेंचं नेतृत्व ज्यांना मान्य आहे त्यांना राष्ट्रवादीत येण्यात काहीच अडचण नाही असे लोक राष्ट्रवादीत येतील. तसंच, करोना काळात विधानसभेची निवडणूक घेणं परवडणार नाही त्यामुळं ते १० ते १२ आमदारांची घडनात्मक अडचण निर्माण होऊ नये, म्हणून हे आमदार नंतर राष्ट्रवादीत येणार आहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. असं वृत्त एका वृत्तवाहिनीनं दिलं आहे
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून शुक्रवारी २ वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सध्या फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांना काही दिवसांत प्रवेश दिला जाईल, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times