म.टा. प्रतिनिधी, नागपूर: करोनाचे संकट काहीसे कमी झाले असले असले तरी आतापर्यंत करोनामुळे नागपूर जिल्ह्यातील ३ हजार लोकांनी जीव गमावला. बुधवारी २१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. ४२९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. बरे होणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याने आजच्या स्थितीला अॅक्टिव रुग्ण ६ हजार ९२ आहेत.

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करोनाने कहर केला. या महिन्यात झपाट्याने वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे रुग्णव्यवस्थेवरही प्रचंड ताण आला होता. या काळात मृत्यूही अधिक झाले. आता संकट काहीसे कमी झाले असले तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे प्रशासनाकडून सूचित करण्यात येत आहे. करोना गेला नसून बचावासाठी सर्व उपाययोजनांचा वापर करणे गरजेचे आहे. बुधवारी ४२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात शहरातील २९१ आणि ग्रामीणमधील १३० रुग्णांचा समावेश आहे. ८ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.

९० टक्क्यांच्यावर रुग्ण बरे

आता करोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण त्यापेक्षा अधिक आहे. बुधवारी ४२९ करोना पॉझिटिव्ह आढळले असून बरे झालेल्यांची संख्या ४५७ आहे. आतापर्यंत एकूण करोनाबाधितींची संख्या ९१ हजार ९८८ झाली असून यातील ८२ हजार ८९६ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आता ९०.१२ टक्के झाली आहे. आतापर्यंत ५ लाख ८० हजार ९३५ तपासण्या करण्यात आल्या.

करोनाची स्थिती

बुधवारचे पॉझिटिव्ह : ४२९
एकूण पॉझिटिव्ह : ९१९८८
बुधवारचे मृत्यू : २१
एकूण मृत्यू : ३०००

असा वाढला मृत्यू ग्राफ

तारिख : मृत्यू
२१ ऑक्टोबर : ३०००
२० सप्टेंबर : २०४४
२६ ऑगस्ट : ८५९
२९ जुलै : १०७
२४ जून : १३
२० मे : ७

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here