पक्ष सोडताना खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले असले तरी आता त्यांच्याबद्दल अन्य नेत्यांकडूनच प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. रावसाहेब दानवे यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. खडसे हे मूळचे भाजपचे नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘खडसे हे एस काँग्रेसमध्ये होते. शरद पवारांनी जळगावपासून नागपूरपर्यंत दिंडी काढली होती, तेव्हा खडसे हे एस काँग्रेसमध्येच होते. मी मूळचा भाजपचा आहे आणि खडसेंना सीनियर आहे. खडसे, मुंडे यांच्यासह आम्ही अनेकांनी एकत्र काम केलं असल्यामुळं आमच्या एकमेकांच्या वाटचालीबद्दल माहीत आहे,’ असंही दानवे म्हणाले.
वाचा:
भाजपमध्ये एकाधिकारशाही असल्याच्या खडसेंचे आरोपही दानवे यांनी फेटाळले. ‘माझ्या पोटात अनेक गोष्टी आहेत, ज्या फडणवीसांना मान्य नव्हत्या. पण त्यांना सांगितल्यावर त्यांनी त्या मान्य केल्या. त्यामुळं फडणवीस एकटे निर्णय घेतात असं म्हणणं चुकीचं आहे. भाजपमध्ये सामूहिक निर्णय होतो. आधीही कधी एक व्यक्ती निर्णय घेत नव्हती, आताही घेत नाही आणि यापुढेही घेणार नाही,’ असंही दानवे म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times