जळगावः ‘भाजपने माझ्यावर अन्याय केला. मी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी, ही कार्यकर्त्यांची भावना,’ असल्याचं यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे पहिल्यांदाच मुक्ताईनगरात आले असून त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

भाजपला राम राम केल्यानंतर एकनाथ खडसे हे आज मुक्ताईनगरमध्ये आले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांची जंगी स्वागत केलं आहे तर, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनीही गर्दी केली होती. या सर्व शुभेच्छांचा विचार करत खडसेंनी त्यांच्यासोबत संवादही साधला आहे. ‘मी भाजप सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती, असंही ते म्हणाले आहेत.

‘भाजपने माझ्यावर अन्याय केला. मी भाजप सोडल्यानंतर कार्यकर्त्यांना आनंद झाला आज त्यांचाच उत्सव आहे. आज खऱ्या अर्थानं माझं सीमोल्लंघन झालं आहे. रोहिणी खडसेंना तिकीट देणं ही भाजपची खेळी होती. भाजपच्या गद्दर कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी काम केलं. त्याविषयी मी चंद्रकांत पाटील यांना दहा महिन्यांपूर्वीच पुरावे दिले होते. मात्र, त्यांच्याविरोधात कारवाई झाली नाही. याच अर्थ त्यांच्यामागे कोणीतरी उभं होत हे उघड आहे. या लोकांवर कारवाई करायची नाही हे दिसत होतं.’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

‘माझा भाजपला विरोध नाही पण, भाजपमधील वाईट प्रवृत्तीविरोधात मी लढा दिला. मला मंत्रिपदावरून का काढलं हे अजूनही सांगू शकले नाही. कारण काय होतं ते ही त्यांना सांगता आलं नाही,’ असा आरोप करतानाच त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर तोफ डागली आहे. एका व्यक्तीमुळं माझं नुकसान झालं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here