खटल्याची सुनावणी दिल्लीत व्हावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात केली. हाथरस प्रकरणी एक जनहित याचिकाही दाखल केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीत चौकशी व्हावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. यूपीत खटल्याची चौकशी आणि सुनावणी योग्य होणार नाही, म्हणून हा खटला दिल्लीला हस्तांतरित करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पीडित कुटुंब आणि साक्षीदारांचे तीन-स्तरीय संरक्षण दिलं जात असल्याचं उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं. हाथरसमध्ये १४ सप्टेंबरला १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार आणि तिचा छळही केला गेला, असा आरोप आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times