पाटणाः बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पण यापूर्वी नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलापासून ( JDU ) स्वत: ला दूर ठेवत असल्याचे संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणूक सोबत लढत असले तरी दोन्ही पक्ष समांतर प्रचार करत आहेत. एवढचं नव्हे एकमेकांचं प्रचार चिन्हंही गायब आहे. तेजस्वी यादव यांच्या होर्डिंग्जमध्ये लालू-राबडी यांचे नसल्याने एनडीए नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी पोस्टर्स लावून भाजप मत का मागत आहे? आणि त्यात नितीशकुमारांचा उल्लेख का नाहीए? या प्रश्नाचे उत्तर एनडीए नेत्यांकडे नाहीए. सासाराममधील पहिल्या सभेत पंतप्रधान मोदींनी एनडीए सरकारला मत देण्याचं आवाहन केलं. नंतर त्यांनी नितीशकुमारांनाही मत देण्याचं आवाहन केलं. पण केमिस्ट्री ‘गायब’ होती.

नितीशकुमारांविरोधात असंतोष खूप आहे. एवढचं नव्हे तर भाजप नेत्यांमध्येही नाराजी आहे. यामुळे हे ठरवून केलं जात आहे, असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येतंय. नितीशकुमार यांची स्वच्छ प्रतिमा असूनही भाजप समर्थकही त्यांना मत देऊ इच्छित नाहीत. याचं कारण म्हणजे नर्बंध आणि सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचारामुळे सरकारविरोधात वाढती नाराजी आहे. चिराग पासवान यांनी १३५ उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत. पण पंतप्रधान मोदींच्या नावाने मतं मागत नाहीत तोपर्यंत एनडीएला कुठलीही संधी मिळण्याची शक्यता नसल्याचं भाजपचं स्पष्ट मत आहे. बिहारमध्ये मोदींची लोकप्रियता कायम आहे, असा फिडबॅक भाजपला मिळाल आहे.

स्थलांतरी कामगारांचा मुद्दा आणि सामान्यांबाबत उदासिनतेमुळे मतदार नितीशकुमारांवर नाराज आहेत. आणि म्हणूनच सुशील मोदी आणि रविशंकर प्रसाद सोडून इतर कोणतेही भाजप नेते संयुक्त प्रचारासाठी उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या प्रतिमेच्या जोरावर मत मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नितीशकुमार यांना अविश्वासाचा सामना करावा लागतोय. आता पण त्यांना पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या आणखी नऊ सभा होणार आहेत. यामुळे आता पंतप्रधान मोदींच्या सभांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here