नगर: ‘ प्रश्नासंदर्भात जी वस्तुस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे. आता त्याच्यापुढे अजून काय असेल तर ते भाजपचे खासदार आहेत, त्यांनी मंत्रालयात काय शिजतं हे विषद करावं,’ असे वक्तव्य राज्यमंत्री यांनी केले व एकप्रकारे खासदार डॉ. यांना आव्हानच दिले. ( Slams )

वाचा:

‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता यांच्यावर विश्वास ठेवायचा की यांच्यावर हे जनतेनेच ठरवावे. भविष्यकाळात कोण खरे ठरते, हे निवडणुकीपूर्वी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य नुकतेच खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले होते. याबाबत मंत्री तनपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘विखे यांच्या वक्तव्यावर मला फार भाष्य करायचे नाही. मला एवढेच माहिती आहे, शरद पवार हे राजनाथ सिंह यांच्याकडे गेले होते. आमदार निलेश लंके हे देखील त्यांच्यासोबत होते. मी त्यावेळी करोनामुळे आजारी असल्याकारणाने जाऊ शकलो नाही. मात्र, त्या बैठकीत पवार साहेबांनी वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर वरती काय चक्र फिरले, मला माहिती नाही. परंतु काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात संरक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी येऊन सांगितले की आम्ही जमीन अधिग्रहण करणार नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांना लष्कराचे अधिकारी सांगत असतील, तर के के रेंज प्रश्नासंदर्भात संभ्रम निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही.’

वाचा:

के के रेंज प्रश्नासंदर्भात भाजपचे स्थानिक नेत्यांनी राजकारण सुरू केलयं का, असे तनपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी आपले माझे बघत असतो. कोण काय बोलते, यामध्ये मला जास्त रस नाही. जी वस्तुस्थिती आहे, ती मी सांगितली आहे. आता याच्यापुढे अजून काय असेल तर ते भाजपचे खासदार आहेत. त्यांनी मंत्रालयात काय शिजतं, हे विषय करावे.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

2 COMMENTS

  1. Morphometry reveals that the apical localization of H ATPase is not different among the 3 treatment groups A cialis online RNF128 downregulation promotes melanoma progression both in vitro and in vivo assays

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here