मुंबईः ‘दसरा मेळाव्यातील त्याचं भाषण म्हणजे शिमग्याचं भाषण होतं’, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

मराठा आरक्षणाला चार आठवडे स्थगिती मिळाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक भाषणाची राजकीय वर्तुळाच चर्चा आहे. यावरून चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी पदाची गरिमा राखायला हवी होती. फक्त, मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून मी बोलत आहे असं म्हणून चालत नाही. तुम्ही काय बोलता, तुमची काय भाषा आहे. या सगळ्याचा तुम्ही विचार केला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसंच, मुख्यमंत्र्यांच्या भाषणात महाराष्ट्रातील कोणत्याच विषयावर भाष्य करण्यात आलं नाही. भाषणात एकच मुद्दा होता तो म्हणजे भाजप,’ असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी भाषणात उल्लेख केलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतंय हे जनतेला माहिती आहे. आम्ही काय आहोत हे तुम्हाला निवडणुकीतच दाखवून देऊ,’ ‘हम किसी को टोकेंगे नही, कोई टोकेगा तो छोडेंगे नही,’ असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here