पुणेः काहीजण पराभव साजरा करायला येतात, या यांच्या टीकेला भाजप नेते यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पराभव साजरा करण्यात गैर काय? तो साजरा करायलाही नशीब लागते, असं सडेतोड उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.

पंकजा मुंडे यांनी दसऱ्याला भगवान गडावर ऑनलाइन मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी फक्त ५० जणांची उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, तरीही पंकजा यांच्या दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी काहीजण पराभवानंतर जिल्ह्यात येतात, अशी टीका केली होती. यावरच पंकजा मुंडे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी धनंजय मुंडे यांनी माझ्यावर काय टीका केली याची कल्पना नाही, पण पराभव साजरा करण्याइतकं नशीब कोणाचं असतं, असा टोला त्यांनी हाणला आहे.

पराभव साजरा करण्याची खिलाडूवृत्ती माझ्यात आहे. इतके दिवस सगळे म्हणत होते ताई घराच्या बाहेर पडत नाहीत. आता बाहेर पडले तर म्हणत आहेत की पराभव साजरा केला. एखादी पराभव झालेली व्यक्ती जर नांदेडपासून आठ जिल्ह्यांमधील स्वागत स्वीकारत येत असेल आणि त्याचा इतका मोठा मेळावा होत असेलत तर ही पुण्याईच म्हणेन, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उसतोड कामगारांच्या संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी आज पुण्यातील एका बैठकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here