मुंबई: हॉटेलातील अन्नपदार्थ उधार दिले नाहीत म्हणून दोघा भावंडांनी हॉटेलमालकाला चाकूने भोसकून त्याची हत्या केल्याची घटना रविवारी अंधेरीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूर्वेकडील नित्यानंद गॅरेजजवळ ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी पवई पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दोघा आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. अरिफ अन्सारी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. चांदिवलीत तो राहत होता. साकिनाका येथे आरिफ आणि त्याचा मोठा भाऊ आसिफ हे हॉटेलचा व्यवसाय करत होते. २५ ऑक्टोबर रोजी रात्री साधारण आठ वाजताच्या सुमारास विपुल सोलंकी (वय २२) हा हॉटेलमध्ये आला. त्याने जेवणाची ऑर्डर दिली. अन्सारीने ऑर्डर घेण्यास नकार दिला. महिन्याचे बिल थकले आहे असे त्याने सांगितले. उधारी मागितली म्हणून आरोपी चिडला. त्याने मोठा भाऊ प्रकाश सोलंकी याला हॉटेलमध्ये बोलावले.

प्रकाश सोलंकी हॉटेलमध्ये आला. त्या दोघांनी अन्सारीला हॉटेलबाहेर नेले. नित्यानंद गॅरेजजवळ त्याने अन्सारीला चाकूने भोसकले. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. अन्सारीला राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरू असून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here