वाचा:
पालकमंत्री जयंत पाटील यांना भाजपच्या महापौरांनी महापालिकेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण स्वीकारून पालकमंत्री पाटील यांनी भाजपचे स्थानिक नेते बैठकीसाठी उपस्थित राहावेत, असा आग्रह धरला. याशिवाय भाजपमधील स्थानिक नेत्यांवर आपले विशेष प्रेम असल्याचेही जाहीर वक्तव्य केले. या वक्तव्यावरून भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सगळ्या पक्षांनी मिळून विकासकामे केली पाहिजेत. हे असेच चालले पाहिजे. हीच कार्यपद्धती असली पाहिजे. महानगरपालिका चालवण्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. शेवटी सरकार बदलल्यानंतर सरकारमधील लोकांचे काय म्हणणे आहे, हे अधिकारी बघत असतात. सरकार बदलून एक वर्ष झाले तरीही आमची विकासकामे सुरूच आहेत. सांगली महापालिकेला १०० कोटींचा निधी देण्याची घोषणा आम्ही केली होती. यातील ९ कोटींच्या कामांचा शुभारंभ आम्ही केला आहे.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times