वाचा:
करोनाचा प्रादुर्भाव अजून कमी झालेला नसल्याने व येत्या महिन्यात दिवाळी असल्याने सावध पाऊल टाकत सरकारने राज्यात आणखी एक महिना वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे अनेक निर्बंध शिथील करण्यात आलेले असल्याने त्याचा काही प्रमाणात फटका बसत आहे. करोनाचे आकडे थोडे कमी झाले असले तरी मृतांचा आकडा आणि दैनंदिन नवीन बाधितांचा आकडा अजूनही सरासरी पाच हजारच्यावर असल्याने सरकारकडून पुरेशी सतर्कता बाळगण्यात येत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करोनाची सद्यस्थिती दर्शवणारी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात राज्यात आणखी १५६ करोनामृत्यूंची भर पडली आहे. त्यात सर्वाधिक ३३ मृत्यू हे पालिका हद्दीत झाले आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत १२ जणांचा मृत्यू झाला असून पालिका हद्दीत दोन मृत्यू झाले आहेत. पुणे शहरात करोनामृत्यूचा कमी झालेला आकडा हा खूप मोठा दिलासा मानला जात आहे. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ४३ हजार ७१० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या राज्यातील २.६२ टक्के इतका आहे.
वाचा:
राज्यातील अन्य आकडेवारीवर नजर मारल्यास गेल्या २४ तासांत ५ हजार ९०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ७ हजार ८८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८९.६९ टक्के इतके झाले आहे. तो खूप मोठा दिलासा ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आणखी खाली येऊन आता २४ हजार १९४ झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात हा आकडा २० हजारच्या आत आहे. जिल्ह्यात १९ हजार २५७ तर मुंबई पालिका हद्दीत १९ हजार ८२ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. करोनाची साथ आल्यापासून आतापर्यंत राज्यात ८८ लाख ३७ हजार १३३ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १६ लाख ६६ हजार ( ६६८ १८.८६ टक्के ) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या २५ लाख ३३ हजार ६८७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर १२ हजार ६९० जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times