नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडरने अभिनंदन वर्धमान ( abhinandan varthman ) यांच्या सुटकेच्या मुद्द्यावरून पाकिस्तानमध्ये राजकारण तापलं आहे. या मुद्द्यावर हवाई दलाचे माजी प्रमुख निवृत्त एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी स्पष्टता आणली. विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या हवाई करण्याशिवाय पाककडे कुठलाही पर्याय नव्हता, असं धनोआ म्हणाले.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे मिग 21 विमान पाकस्तानमध्ये कोसळले. त्याच भागात भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या छुप्या ठिकाणावर हवाई हल्ले केले होते. यानंतर पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांशी झालेल्या लढाईत अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानात कोसळले आणि त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. मात्र, यापूर्वी अभिनंदन यांना पाकचे एफ -16 हे अत्याधुनिक लढाऊ विमान पाडण्यात यश आले होते.

पाकच्या संसदेत एका खासदाराने अभिनंद वर्धमान यांच्या सुटकेसंदर्भात उभय देशांमधील चर्चेदरम्यान पाक सैन्याचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा ( ) हे कसे थरथरत होते आणि घामाघूम झाले होते, हे विरोधी पक्षाच्या नेत्याने सांगितलं. यावरून पाकमध्ये वाद सुरू आहे. तर हवाई दलाचे माजी प्रमुख बी. एस. धनोआ यांनीही याबाबत माहिती दिलीय.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केला. त्याच्या २४ तासांनंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात हवाई संघर्ष सुरू झाला होता.

धनोआ यांनी वर्धमानच्या वडिलांना काय सांगितलं?

‘अभिनंदन यांच्या वडिलांशी आपली बऱ्यास काळापासून ओळख आहे. आम्ही फ्लाइंग इन्स्ट्रक्टरचा कोर्स सोबतच केला. पण अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात गेला, तेव्हा आपल्याला कारगिल लढाईत फ्लाइट कमांडर आहुजा आठवले. त्यांना पाकिस्तानने पकडलं होतं आणि त्यांच्या गोळी झाडली होती. आपल्या डोक्यात हे सर्व काही सुरू होतं. सर, आपल्याला माहिती आहे आम्ही आहुजाला परत आणू शकलो नाही, पण अभिनंदनला नक्कीच परत आणू.’, असं आपण त्यांना सांगितल्याचं धानोआ म्हणाले. एएनआयने हे वृत्त दिलंय. स्क्वॉड्रन लिडर अजय अहुजा हे मिग -21 चे पायलट होते. १९९९ मध्ये कारगिलच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याने त्यांना पकडले. त्याचे विमान पाकिस्तानी सैन्याने खाली पाडले. त्यानंतर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या.

काय म्हणाले धनोआ?
पाकस्तानला भारताची ताकद माहिती आहे. यामुळे विंग कमांडर वर्धमान यांना ते काहीही करू शकत नव्हते. याचे दोन पैलू आहेत. पाकिस्तानवर सुरुवातीला मुत्सद्दी व राजकीय दबाव आणत होता. पण त्यांना सैन्याचा दृष्टीकोनही बघायचा होता. ज्या प्रकारे पाकचे नेते (अयाज सादिक) असे सांगताहेत की त्यांचे (जनरल बाजवा) यांचे पाय थरथरत होते, तर यामागचं कारण होत भारतीय सैन्य. त्यावेळी लष्कर, नौदल आणि हवाई दल सर्वच आक्रमक झाले होते, असं धनोआ यांनी स्पष्ट केलं.

पाकिस्तानच्या दुर्दैवाने त्यांनी जर भारतावर हल्ला केला असता तर त्यांची संपूर्ण फॉरवर्ड ब्रिगेड साफ झाली असती, इतकी आपली जय्यत तयारी होती. पाकला भारताची ताकद माहिती आहे. आपण पाकिस्तान थेट हल्ला करू शकतो, हे त्यांच्या डोक्यात असेल तर ते प्रथम त्यांच्या सैन्याची क्षमता पडताळून पाहतील. अमेरिकेचे माजी अध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट म्हणायचे, ‘गोड बोला आणि नेहमी आपल्याकडे मोठी काठी ठेवा’. तर आपल्याकडील ती मोठी काठी म्हणजे भारतीय सैन्य होतं, असं धनोआ यांनी स्षष्ट केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here