वाचा:
खासदार रक्षा खडसे यांनी आज दुपारी जळगावात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या ध्येय-धोरणांवर टीका केली. ‘केळी पीक विम्याचा मुद्द्यावर राजकारण होऊ शकत नाही. जळगाव जिल्ह्यातील सुमारे ५० हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांशी निगडित हा मुद्दा आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले म्हणून आम्ही केळी पीक विमाप्रश्नी आंदोलन करत आहोत असे नाही. उलट ते या मुद्द्याचा पाठपुरावा करताना आम्हाला मदत करतील. ते जे बोलतील ते शेतकऱ्यांच्या बाजूनेच बोलतील. कारण त्यांचा या गोष्टींमध्ये चांगला अभ्यास आहे. मागच्या काळात जेव्हा राज्यात भाजप सरकार होते. मुख्यमंत्री आणि नाथाभाऊ कृषी मंत्री होते, तेव्हा केळी पीकविम्याचे निकष शेतकऱ्यांच्या हिताचे केले गेले होते. आता नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांसाठी कसं काम करावं लागतं, हे कळेल. नाथाभाऊ शेतकऱ्यांच्याच बाजूने बोलतील, अशी मला आशा आहे’, असे रक्षा खडसे यांनी सांगितले.
वाचा:
राज्य सरकारवर टीका
केळी पीक विम्याच्या मुद्द्यावरून खासदार रक्षा खडसेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. राज्य सरकार आणि प्रशासनातील अधिकारी हे पीक विमा कंपन्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल, या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. पीक विम्याचे निकष ठरवताना जो घोळ झाला आहे, तो राज्य सरकारने जाणीवपूर्वक केला आहे. काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना आणली. पण, राज्य सरकार यात राजकारण करता यावे, म्हणून शेतकऱ्यांसोबत खेळ खेळत आहे. हे अतिशय चुकीचे आहे, असेही रक्षा खडसे म्हणाल्या.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times