बेंगळुरू: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्याला बेंगळुरू येथे सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. आता भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाला भारतीय भूमीवर सलग दुसऱ्या मालिका विजयापासून रोखायचे आहे.
Live अपडेट- (India Vs Australia)
>> भारताला पहिले यश; मोहम्मद शमीने घेतली डेव्हिड वॉर्नरची विकेट
>> ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरूवात
>> भारतीय संघात कोणताही बदल नाही
>> ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times