वाचा:
संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत मापारी यांनी म्हटले आहे की, आपण संगमनेरहून लोणीकडे जात असताना ही घटना घडली. राजकीय द्वेष मनात ठेवून कायम मला धमक्या देणारे रहिमपूर येथील सचिन रघुनाथ शिंदे, रवींद्र आबाजी गाडे, सुशील रघुनाथ शिंदे व इतर दहा पंधरा जणांनी एकटे गाठून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
वाचा:
जखमी अवस्थेत मापारी यांना संगमनेरमध्ये तांबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला व डोळ्याला इजा झाली असून हाताचे व पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याचे सांगण्यात आले. हल्लेखोरांना तातडीने अटक करावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times