कोल्हापूर: राज्यपाल नियुक्त १२ जागासंदर्भात फडणवीस व राज्यपालांमध्ये आधीच काहीतरी ठरलंय हे माझं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी फेटाळलेलं नाही. मी खोटं बोलतोय असंही ते म्हणालेले नाहीत. त्यांनी एक प्रकारे माझ्या माहितीस दुजोराच दिलेला आहे,’ असा दावा करत ग्रामविकास मंत्री यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना पुन्हा लक्ष्य केलं आहे.

‘विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांवरून सरकारमध्ये सध्या बराच खल सुरू आहे. मंत्रिमंडळानं सुचवलेली नावं राज्यपाल मान्य करतील का, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळं विचारपूर्वक ही नावं पाठवली जाणार आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांच्या हवाल्यानं मुश्रीफ यांनी काल एक गौप्यस्फोट केला होता. ‘ठाकरे सरकार देणार असलेली १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बाजूला ठेवणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्यपाल यांच्यात झालेल्या चर्चेत हे ठरलं आहे. चंद्रकांत पाटील हेच असं म्हणाले होते,’ असं मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. ते योग्यच असल्याचा दावा मुश्रीफ यांनी आज केला आहे.

वाचा:

‘मी दादांचे मनापासून आभार मानतो, कारण सन्माननीय राज्यपाल व सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामधील चर्चेबाबत वारणेवर त्यांनी जे वक्तव्य केले होते. त्याचा स्पष्ट इन्कार त्यांनी केलेला नाही. दुपारी १२ वाजता माझी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पुण्यामध्ये दादांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘राज्यपालांना संविधानाने अधिकार दिले आहेत, ते तसे करू शकतात, असं म्हणून विनय कोरे यांच्याशी राज्यपालनियुक्त सदस्यांविषयी झालेल्या चर्चेला पाटील यांनी एक प्रकारे दुजोरा दिला आहे,’ असं मुश्रीफ यांचं म्हणणं आहे.

वाचा:

‘मुश्रीफ यांचं विधान हास्यास्पद आहे, असं वक्तव्य संध्याकाळी त्यांनी केलं. मात्र, असं विधान आपण स्वतः केलेलं नाही, मुश्रीफ खोटे बोलत आहेत किंवा त्या भागातील जागृत देवस्थान श्री. जोतिबाची शपथ घेतो, असं काहीही म्हटलेलं नाही. दादांचा तो स्वभावही नाही. याचा अर्थ माझी माहिती योग्य आहे, असंही मुश्रीफ यांनी पत्रकात पुढं म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here