दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर टीका केल्यानंतर राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरही टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:साठी एक नोकरी घ्यावी कारण ते स्वत: बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात, असा टोला त्यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्वत:साठी एक नोकरी घ्यावी कारण ते स्वत: बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात. स्वत: काहीतरी करतील तरच नोकरी व व्यवसायाची किंमत कळेलं, असं म्हणत निलेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.
३४,८५० कोटींची महाराष्ट्रात गुंतवणूक
मॅग्नॅटिक महाराष्ट्रच्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ जून महिन्यात करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात तब्बल ३४ हजार ८५० कोटी रु.च्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या माध्यमातून २३ हजार १८२ रोजगार उपलब्ध होणार आहेत. एमआयडीसी आणि १५ कंपन्यांमध्ये हे सामंजस्य करार झाले आहेत.
जपानमधील मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया ४९० कोटी, भारतातील ब्राईट सिनो होल्डिंग १८०० कोटी, स्पेनमधील मंत्रा डेटा सेंटर १ हजार १२५ कोटी तर अदानी एंटरप्रायजेस ही कंपनी ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय नेक्स्ट्रा कंपनी अडीच हजार कोटी, तर इंग्लडमधील कोल्ट कंपनी ४ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. लॉजिस्टिक पार्क, डेटा सेंटर, रसायने, इलेक्ट्रॉनिक्स, इंधन, तेल व वायू या क्षेत्रात ही गुंतवणूक होईल. प्रत्येक कंपनीत किमान ३००पासून अडीच हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times