वाचा:
ज्येष्ठ गीतकार यांनी ही फौजदारी तक्रार केली आहे. कंगना राणावत हिने टीव्हीवरील मुलाखतींमध्ये माझ्याबद्दल बदनामीकारक आणि निराधार वक्तव्ये केल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अख्तर यांनी अंधेरी येथील महानगर दंडाधिकाऱ्यांसमक्ष ही फौजदारी तक्रार केली असून कंगनाविरुद्ध भारतीय दंड विधानातील मानहानी संबंधी कलमांखाली कारवाई करण्यात यावी, अशी विनंती कोर्टाकडे केली आहे.
कंगना राणावतने माझ्याबद्दल निराधार वक्तव्ये केली असून यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे अख्तर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अभिनेता आत्महत्या प्रकरणाशी संबंधित वादात कंगनाने माझे नाव नाहक ओढले, असा आरोपही अख्तर यांनी केला आहे. प्रकरणात माफी मागण्यासाठी घरी बोलावून दमदाटी केल्याचा धादांत खोटा आरोपही तिने माझ्यावर केला असून या सर्वाची गंभीर दखल घेत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी विनंती अख्तर यांना कोर्टाकडे केली आहे.
वाचा:
कंगना मुलाखतीत काय म्हणाली होती?
कंगनाने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलीवूडवर गंभीर आरोप केले होते. घराणेशाहीमुळे बॉलीवूडची वाट लागली आहे. बॉलीवूडमध्ये माफियाराज पसरले आहे, असा आरोप कंगनाने केला होता. त्यात दिग्दर्शक महेश भट आणि जावेद अख्तर यांच्यावरही तिने गंभीर आरोप केले होते. ऋतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यात मोठा वाद भडकला होता. या प्रकरणात बोलू नये म्हणून अख्तर यांनी माझ्यावर दबाव टाकला. मला ऋतिक व त्याच्या कुटुंबीयांची माफी मागायला सांगितले. तसे केले नाही तर तुला ते जेलमध्ये टाकतील, अशी दमदाटी अख्तर यांनी केल्याचे कंगनाने मुलाखतीत जाहीरपणे सांगितले होते. कंगनाची बहिण रंगोली हिनेसुद्धा सोशल मीडियावर असेच आरोप केले होते. त्यामुळेच अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे.
वाद पुन्हा चिघळणार
जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध फौजदारी तक्रार केल्याचे ट्वीट शिवसेना नेते यांनीही केले आहे. ते ट्वीट एम्बेड करून कंगनाने राऊत यांना लक्ष्य केले आहे. ‘एक थी शेरनी… और एक भेड़ियों का झुंड’, असं प्रत्युत्तर कंगनाने दिलं आहे. त्यामुळे येत्या काळात नवा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times