मुंबई: वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे भाजपचे नेते संतप्त झाले आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यानंतर आता महाराष्ट्रातील नेत्यांनीही पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. महाराष्ट्रात आणीबाणी सदृश परिस्थिती असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते व आमदार यांनी केला आहे. (, target Thackeray Government)

वाचा:

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून गोस्वामी यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता आजही कायम आहे. आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे,’ असं ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे.

आशिष शेलार यांनीही राज्य सरकारवर तोफ डागली आहे. ‘लोकशाहीसाठी आजचा दिवस काळा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. ‘एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णी यांना अटक केली गेली. सरकार विरोधात सोशल मीडियावर बोलणाऱ्या निवृत्त नौदल अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले आहे. आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या… वा रे वा लोकशाही सरकार,’ असा उपरोधिक टोला शेलार यांनी हाणला आहे.

‘काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार… हाच का तुमचा लोकशाही कारभार?,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने चालला आहे का,’ अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here