जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शिवसेनेच्या आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसुचित जमातीचा उल्लेख असणारे प्रमाणपत्र नंदुरबार येथील अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरविले आहे. त्रिसदस्यीय समितीने याबाबत दि. ४ नोव्हेंबर रोजी आदेश काढले असल्याची माहिती तक्रारदार माजी आमदार यांनी दिली. यामुळे आता यांचे आमदारपद धोक्यात आले असल्याचे दिसत आहे. ( MLA ‘s Declared Invalid )

वाचा:

चोपडा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. येथून लताबाई चंद्रकांत सोनवणे या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी लताबाई यांच्या अनुसूचित जमातीचा दावा करणाऱ्या प्रमाणपत्राबद्दल उपसंचालक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून समितीसमोर सुनावणी झाली. दरम्यान निकालास विलंब होत असल्याने तक्रारदार वळवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने समितीला लवकरात लवकर निकाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासणी समितीने बुधवारी (दि.४) याबाबत निकाल देत लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे अनूसुचित प्रमाणपत्र अवैध ठरवून ते रद्द करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.

वाचा:

असा आहे निकाल

लताबाई चंद्रकांत कोळी कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे तसेच आप्तभाव संबध परीक्षेच्या आधारे त्यांचा टोकरे कोळी अनूसुचित जमातीचा दावा सिद्ध करू शकलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा हा दावा अवैध ठरविण्यात येत आहे तसेच त्यांनी सादर केलेले उपविभागीय अधिकारी, जळगाव यांनी दिलेले टोकरे कोळी अनूसुचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे. आदेश झाल्यापासून लताबाई यांनी आठ दिवसांच्या आता मूळ जमातीचे प्रमाणपत्र जमा करावे असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांनी संबधित राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविली असल्याने तसेच संबधित प्रमाणपत्राच्या आधारे देय नसलेला लाभ मिळवल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी जळगाव महापालिका आयुक्तांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या दिनेश तिडके, शुभांगी सपकाळ व सीताराम भालेकर या त्रिसदस्यीय समितीने हा निकाल दिला आहे.

वाचा:

खऱ्या आदीवासींना न्याय मिळाला: वळवी

तक्रारदार जगदीशचंद्र वळवी यांनी या निकालामुळे खऱ्या आदीवासींना न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दीड वर्षांपूर्वी याबाबत तक्रार केली होती. निकालास विलंब लागत असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर न्यायालयाने समितीला आदेश दिल्याने ४ नोव्हेंबर रोजी निकाल देण्यात आल्याची माहितीही वळवी यांनी दिली.

न्यायालयात आव्हान देणार

याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी लताबाई सोनवणे यांना संपर्क केला असता, होवू शकला नाही. दरम्यान त्यांचे स्वीय सहाय्यक गणेश भोईटे यांनी या निकालाविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

  1. I’ve been troubled for several days with this topic. totosite, But by chance looking at your post solved my problem! I will leave my blog, so when would you like to visit it?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here