फारूख अब्दुल्ला म्हणाले की, ‘आम्हाला जायचे असतेच तर आम्ही १९४७ सालीच पाकिस्तानात गेलो असतो. त्यावेळी आम्हाला रोखणारे कोणीच नव्हते. मात्र आम्ही भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आणि हा आमचा देश आहे. आमचा देश गांधींचा आहे, भाजपचा नाही.’
भाजपवर केले देशाची दिशाभूल करण्याचा आरोप
भारतीय जनता पक्ष देशाची दिशाभूल करत असून जम्मू आणि काश्मीरसह लडाखच्या लोकांना खोटी आश्वासने देतो, असे फारूख अब्दुल्ला म्हणाले. आपल्या लोकांचे हक्क जोपर्यंत मी परत मिळवत नाही, तो पर्यंत मी मरणार नाही… मी येथे लोकांचे काम करण्यासाठी आहे. ज्या दिवशी माझे काम संपेल त्या दिवशी मी येथून निघून जाईन असे फारूख अब्दुल्ला म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
१ वर्षानंतर जम्मूत घेतली बैठक
जम्मू आणि काश्मीरमधून हटवल्यानंतर फारूख अब्दुल्ला यांनी ही पहिली राजकीय बैठक घेतली. जम्मू आणि काश्मीरपासून लडाख वेगळे केले जाईल याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. मात्र कलम ३७० आणि ३५ अ पुन्हा लागू करण्याच्या उद्देशाने आम्ही विविध पक्ष एकत्र आलो आहोत, असे फारूख अब्दुल्ला पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times