वृत्तसंस्था, कोलकाता :
पश्चिम बंगालचे गमावलेले वैभव परत मिळवून देण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री यांनी शुक्रवारी व्यक्त केले. राज्यातील सध्याच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाची आध्यात्मिक जाणीव टिकवून ठेवण्याच्या या राज्याच्या जुन्या परंपरेला धक्का पोहचला आहे, असेही शहा म्हणाले.

अमित शहा दोन दिवस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी त्यांनी येथील प्राचीन दक्षिणेश्वर काली मंदिरात जाऊन देवीची पूजा केली. ‘मी संपूर्ण राज्य, देश आणि जनतेच्या भल्यासाठी प्रार्थना केली. यांच्या नेतृत्वात देशाने जगातील आपले वैभवशाली स्थान टिकवून ठेवावे अशी प्रार्थना आम्ही केली’, असे शहा यावेळी म्हणाले.

वाचा : वाचा :

बंगाल ही चैतन्य महाप्रभू, श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या असल्याचे सांगत शहा म्हणाले, ‘हे राज्य एकेकाळी संपूर्ण देशात आध्यात्मिक प्रबोधनाचे केंद्र होते. मात्र या राज्यातील तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे बंगालच्या या वैभवशाली परंपरेला धक्का पोहोचला आहे. त्यामुळे बंगाली जनतेने जागृत व्हावे आणि या राज्याचे वैभव परत मिळविण्यासाठी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या, असे आवाहन मी करतो.’

वाचा : वाचा :

‘कोलकाता येथील दक्षिणेश्वर काली मंदिरात पूजा करून मी धन्य झालो. देवीचा आशीर्वाद सतत भारतावर राहो. मी येथून ऊर्जा आणि चैतन्य घेऊन निघत आहे’, असे ट्वीट अमित शहा यांनी केले.

दक्षिणेश्वर मंदिरातून शहा प्रख्यात गायक पंडित यांचे संगीत विद्यालय आणि निवासस्थान असलेल्या ‘श्रुतीनंदन’ येथे पोहोचले. तिथे त्यांनी चक्रवर्ती यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. पंडित चक्रवर्ती हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तो खोडून काढताना चक्रवर्ती म्हणाले, ‘शहा यांचे आमच्या निवासस्थानी आदरातिथ्य करून मला आनंदच झाला. मात्र भाजप प्रवेशाचा कोणताही हेतू माझ्या मनात नाही.’

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here