मुंबईः राज्यात करोना संसर्गाचा विळखा आता सैल होताना दिसत आहे. आज राज्यात १५० करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून ३ हजार ९५९ नवीन रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

राज्यात ऑगस्टनंतर करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं चिंतेचं वातावरण पसरलं होतं. परंतु, आरोग्य प्रशासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नांची शर्थ करत संख्या कमी करण्याचे प्रयत्न केलं. ऑक्टोबरमध्ये करोना संसर्गास उतार होत आहे. रुग्णवाढीचा दरही कमी होत आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट आता ९१. ५३ टक्के इतका आहे. आज ६ हजार ७४८ रुग्णांनी करोनाची लढाई जिंकली आहे. त्यामुळं राज्यात आजपर्यंत १५ लाख ६९ हजार ०९० करोना रुग्ण बरे झाले आहेत.

वाचाः

दिलासादायक बाब म्हणजे सध्या राज्यात १ लाखांच्या खाली आली आहे. सध्या राज्यात ९९ हजार १५१ इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्याच्या विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर, आज १५० रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला असून आजपर्यंत ४५ हजार ११५ जणांचा करोना संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३,७८,५३१ चाचण्यांपैकी १७,१४,२७३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात १०,७१,१६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९,७९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

वाचाः ”वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here