अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना मागील बुधवारी सकाळी रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. अटकेनंतर आज त्यांची रवानगी मंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. अर्णब यांच्या अटकेनंतर भाजपनं राज्यभरात आंदोलनं केली होती. तर, भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनीही निषेध व्यक्त केला होता. भाजपचे आमदार राम कदम यांनी सुद्धा अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत.
भाजप आमदार राम कदम यांनी आज घटकोपर येथील निवासस्थानापासून ते प्रभादेवीच्या सिद्दिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा केली असून अर्णब यांच्या सुटकेनंतर दिवाळी साजरी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, दोन दिवसांपूर्वी राम कदम यांनी मंत्रालयासमोर उपोषण सुरु केलं होतं. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times