नवी दिल्लीः नोटबंदीला ( ) चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ) यांनी रविवारी नागरिकांना पुन्हा विश्वास दिला. सरकारच्या या निर्णयाने काळा पैसा कमी करण्यास मदत झाली आहे. नोटबंदीमुळे कर वसुलीच्या मुद्द्यावर अधिक चांगले पालन दिलून आले आणि पारदर्शकताही वाढली, असा म्हणाले.

नोटबंदीचा अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी सातत्याने सरकारवर हल्ला केला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी नोटबंदीच्या निर्णयावरून पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला. नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली, असं राहुल गांधी म्हणाले.

नोटबंदीमुळे काळा पैसा रोखला गेला आहे आणि कर संग्रह वाढला आहे. त्यात पारदर्शकताही वाढली आहे, असं पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. पंतप्रधान मोदींनी डेमोलिशिंग करप्शन हा हॅशटॅग वापरला. नोटबंदीचे निकाल देशाच्या प्रगतीसाठी खूप फायदेशीर ठरले आहेत. कर संकलना आघाडीवर शानदार काम केले आहे, असं मोदी म्हणाले.

देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी चार वर्षांपासून लागू करण्यात आलेला नोटबंदीच्या निर्णयाने काळ्या पैशावर अंकुश आले आहे. करप्रणालीवर त्याचं अधिक चांगलं पालन झालं आहे. तसंच, डिजिटल अर्थव्यवस्थेला अधिक ताकद मिळाली आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
नोटबंदीमुळे केवळ पारदर्शकताच आली नाही तर टॅक्स बेसही वाढला आहे. यामुळे बनावट नोटा आणि त्याचा प्रसार रोखण्यास मदत झाली, असं सीतारामन म्हणाल्या.

८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. तसंच २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा दिल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here