पदवीधर मतदारसंघातून भाजपने सांगली जिल्ह्यातील यांना उमेदवारी देत महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला आहे. अनेक वजनदार नावे चर्चेत असताना अचानक देशमुखांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने या निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अरुण लाड यांनाच उमेदवारी मिळण्याची चिन्हे असून तसे झाल्यास सांगली जिल्ह्यातील असणाऱ्या या दोघांत जोरदार लढत होणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून शेखर चरेगावकर, राजेश पांडे, माणिक पाटील, रोहन देशमुख, सचिन पटवर्धन, मेघा कुलकर्णी, प्रसेनजित फडणवीस यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती. पांडे यांचे नाव अखेरच्या क्षणापर्यंत आघाडीवर होते. पुण्याला अथवा ब्राम्हण समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास त्याचा फटका बसेल, अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटत होती. त्यामुळे ते नवीन पर्यायाच्या शोधात होते. या निवडणुकीत मराठा कार्ड आवश्यक असल्याने अखेर या पक्षाने देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. ते कृषीराज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या विरोधात लढण्यासाठी दोन वेळा इच्छूक होते. एकदा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला, त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली, दुसऱ्यांदा युतीमध्ये ही जागा सेनेला गेल्याने पुन्हा एकदा देशमुखांना थांबावे लागले. यावेळी त्यांना पदवीधरचा शब्द दिल्याची चर्चा होती. मात्र पुढे त्यांचे नाव फारसे चर्चेत नव्हते.

वाचा:

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोनवेळा या मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे पक्षाची हॅट्रिक करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे दोन प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने देशमुख यांना उमेदवारी देत एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. मराठा कार्ड काढतानाच लाड यांच्यासमोरील आव्हानात वाढ केली आहे. सध्या ही जागा महाविकास आघाडीच्यावतीने लढवताना ती राष्ट्रवादीला मिळणार असून लाड यांची उमेदवारी निश्चित आहे. श्रीमंत कोकाटे, बाळराजे पाटील, उमेश पाटील, नीता ढमाले, प्रताप माने अशी काही नावे चर्चेत असले तरी लाड यांच्याच गळ्यात उमेदवारी पडणार असल्याचे राजकीय खात्रीशीर वृत्त आहे. यामुळे ही निवडणूक आता लाड आणि देशमुख यांच्यात होण्याची चिन्हे आहेत.

वाचा:

सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर व सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीने चांगली बांधली केली आहे. भाजपदेखील यामध्ये मागे नाही. यामुळे ही निवडणूक जोरदार होणार यामध्ये शंका नाही. गेल्या निवडणुकीत सारंग पाटील आणि लाड या राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारात मतांची विभागणी झाल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांचा निसटता विजय झाला होता. यामुळे यावेळी बंडखोरी होऊ नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते काळजी घेत आहेत.

पदवीधर मतदार
कोल्हापूर ८७९५८
सांगली ८५८२७
पुणे ७८८५१
सातारा ५४९०७
सोलापूर ३८७१२

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here