मुंबईः यांच्या अटकेनंतर राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यपालांच्या या भूमिकेनंतर भाजपनंही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना मागील बुधवारी सकाळी रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपलांनी अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. हाच धागा पकडत आमदार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

‘राज्यपालांना अर्णब गोस्वामी यांच्या जीवाला धोका आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलावे लागते हा महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा आहे. सरकारने मुठभर पाण्यात जीव द्यावा,’ अशी घणाघाती टीका राम कदम यांनी केली आहे. त्याचबरोबर, राम कदम यांनी #EmergencyInMaharashtra असा हॅशटॅगही दिला आहे.

अर्णब यांच्या सुटकेसाठी भाजपचे नेते सातत्याने राज्य सरकारविरोधात टीका करताना दिसत आहेत. राम कदम यांनी पहिल्यापासूनच या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाला साकडेही घातले होते. आज ते तळोजा कारागृहात अर्णब याची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना ही भेट नाकारण्यात आली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here