इंटेरिअर डेकोरेटर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई करण्यात आली असून मागील बुधवारपासून ते अटकेत आहेत. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांनी पोलिसांकडून आपल्याला मारहाण होत असल्याचा आरोप होत आहे. फडणवीस यांनीही याच मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयात स्यूमोटो याचिका दाखल करुन घेण्याची मागणी केली आहे.
‘अर्णब गोस्वामी यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडून अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना चुकीची वागणूक दिली जात आहे. या सगळ्याची न्यायालयाने दखल घ्यावी घेऊन न्यायालयानं स्युमोटो याचिका दाखल करून घ्यावी, अशी विनंती फडणवीस यांनी कोर्टाकडे केली आहे.
वाचा:
दरम्यान, अलिबागमधील वास्तुविशारद
यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेले
टीव्हीचे संपादक
यांचा जामीन अर्ज आज मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला. अर्णब यांच्यावतीने तातडीच्या सुटकेसाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, हा अर्ज फेटाळण्यात आल्याने अर्णब यांना जामीन मिळणार की नाही याचा फैसला आता अलिबाग सत्र न्यायालयातच होणार आहे.
वाचाः वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times